विश्वेश्वरय्या ‘एक महान अभियंता होते’ म्हणणाऱ्या कुणालाच त्यांचे व्यक्तिमत्त्व कळलेले नाही!
‘ते एक महान अभियंता होते’ असा एक शिक्का मारून बाजूला सरकून जाणाऱ्या कुणालाच त्यांचे व्यक्तिमत्त्व कळलेले नाही. हत्ती पाहू इच्छिणाऱ्या आंधळ्यासारखी आमची ‘दृष्टी’ आहे. ‘आम्हाला कळेल तेवढीच समोरची व्यक्ती’ ही भावना समाजात सर्वत्रच, सर्वदूर पसरलेली दिसते. आम्हाला जेवढे माहीत तेवढेच विश्वेश्वरय्या, हा मुद्दा मला मान्य नव्हता. मला ‘ते जसे होते तसे’ समजून घ्यायचे होते, समजून द्यायचे होते.......